योजना व अभियाने

स्वच्छ भारत अभियान

ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या पातळीत सुधारणा करणे व गावे हागणदारीमुक्त करणे यासाठी वैयक्तिक/ सार्वजनिक स्वच्छतागृहे/ शाळा व अंगणवाड्यांमध्ये शौचालये, घन व द्रव कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारणे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे योजना

अ. जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, गटर्स, अंतर्गत रस्ते, मलनिस्सारण आणि समाजमंदिर आदी पायाभूत सुविधांचा विकास करणे.

जल जीवन मिशन

प्रत्येक घरात नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय अभियान आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

हे गावातील स्वच्छता सुधारण्यासाठी आणि लोक जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आले आहे.

१५ वा वित्त आयोग

१५ वा वित्तआयोग हे राज्य आणि केंद्र सरकार दरम्यान आर्थिक वितरणाचे न्यायसंगत आणि पारदर्शक नियोजन करणारे महत्त्वपूर्ण आयोग आहे.

जिल्हा वार्षिक योजना

जिल्हा वार्षिक योजना ही जिल्ह्याच्या विकासासाठी निर्धारित उद्दिष्टे आणि प्राधान्ये ठरविणारी महत्त्वाची योजना आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ग्रामस्तरावर रोजगाराची हमी देणारी महत्त्वाची योजना आहे.

प्रधानमंत्री/रमाई/दिव्यांग आवास योजना

प्रधानमंत्री, रमाई आणि दिव्यांग आवास योजना या योजनांचा उद्देश गरजू नागरिकांना सुरक्षित व सुसज्ज घर उपलब्ध करून देणे आहे.

पेसा ५% अबंध निधी योजना

पेसा ५% अबंध निधी योजना ही आदिवासी भागात (PESA क्षेत्रांतर्गत) स्थानिक स्वराज संस्थांना (ग्रामपंचायतींना) अधिक सशक्त व स्वायत्त बनवण्यासाठी राबवली जाणारी योजना आहे. या योजनेचा उद्देश स्थानिक गरजेनुसार विकासकामे हाती घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे हा आहे.

रमाई आवास योजना

रमाई आवास योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील – विशेषतः अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध – कुटुंबांना मोफत किंवा अनुदानित घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा आहे.

शबरी आवास योजना

शबरी आवास योजना ही महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाद्वारे राबविण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश अनुसूचित जमातीतील (आदिवासी) गरजू कुटुंबांना सुरक्षित आणि टिकाऊ घरे उपलब्ध करून देणे हा आहे.

आयुष्यमान भारत योजना – जन आरोग्य अभियान

आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आरोग्य योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे, विशेषतः जे उपचार घेऊ शकत नाहीत अशा गंभीर आजारांसाठी रुग्णालयीन उपचाराचा खर्च सरकारकडून उचलला जातो.